Advertisement

भारत नागपाल हत्या कांड होण्याच्या दोन दिवस आधी, बुरांडे याच्या कडे पिस्तूल आल्याची माहिती?

समाचार शेयर करें

भारत नागपाल हत्या कांड होण्याच्या दोन दिवस आधी, बुरांडे याच्या कडे पिस्तूल आल्याची माहिती?

पिस्तूल आणणारे कोण? दिली कुणाला…?

वर्धा(मंगेश चोरे पाटील) भारत नागपाल यांच्या हत्या प्रकरणात.अद्याप मुख्य सूत्रधार पोलिसांच्या तपासावर आलाच नाही. पोलिसांनी पकडले त्यातील सर्व आरोपी जरी मोका लावला असेल तरी निर्दोष सुटणार असे जाणकारांचे मत व्यक्त होते.या प्रकरणात मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या रडार वर आलेच नाही.असेही चर्चेत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहिती वरून यात मोठ्या देवाण घेवाणीचा विषय होता.हे जरी पुढे आले असले तरी.सूत्रांकडून प्राप्त माहिती वरून भारत नागपाल यांच्या मृत्यूच्या दोन दिवसा आधी.अक्षय बुरांडे नावाच्या भामट्या कडे काही अनोळखी लोक आले होते.आणि त्यांनी पिस्तूल सारखी वस्तू बुरांडे याला दिली अशी माहिती आहे.बुरांडे याच्या परिवाराचा खून करणे हा इतिहास असुन याच्या वडिलांनी खुनाच्या आरोपात जन्मठेप भोगली आहे.याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे.कुणाचाही विश्वासघात करणे हा याचा धंदा असून, अनेकांनी याच्यावर फसवेगिरी केल्याच्या केसेस सुद्धा केलेल्या असल्याचे समजते.

गोपनीय सूत्रांचे आधारे भारत नागपाल यांची मोठी रक्कम ही बुरांडे याच्या कडे होती.नागपाल यांच्या नावावर असलेला घाट हा बुरांडे चालवीत होता.आणि आलेला पूर्ण पैसा हा बुरांडे यानेच गडप केल्याचीही चर्चा आहे.आजही सर्व घाट बंद असताना बुरांडे हा अलगद रेती चोरी करीत असल्याची माहिती आहे.भारत याची हत्या हा नियोजित कट होता.त्यामुळे मारणारे हे संघटित होते.भारत घटावर जाणार असल्याची माहिती बुरांडे यानेच दिली असावी अशीही शंखा आहे.दोन दिवसापूर्वी बुरांडे याच्याकडे आलेले ते व्यक्ती कोण?आणि त्यांनी काय आणून दिले.? याचा खुलासा केवळ बुरांडेच करू शकतो.असे चर्चेत असून.नागपाल यांच्या हत्याकांडात बुरांडे याचा नक्कीच सहभाग असल्याचे चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!